Weather Update September ; पुढील 48 तास घरातच थांबा राज्यावर वरूणराजा कोपणार या जिल्ह्यांत चिंता वाढली.
Weather Update September ; राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा या भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता बळावली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भ भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तसेच ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, सातारा, पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद) मध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरचे संकट अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेता, त्यांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने मोठा फटका दिला आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे, ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.








