Ramchandra sabale havaman andaz ; राज्यातून मान्सून कधी निरोप घेणार रामचंद्र साबळे.
Ramchandra sabale havaman andaz ; रामचंद्र साबळे यांनी राज्यात पावसाचा जोर किती दिवस राहील आणि मान्सून माघार कधी घेईल, तसेच आँक्टोंबर आणि नोव्हेंबरमधील पावसाबाबद अंदाज जाहीर केला आहे. तोच अंदाज आपण सविस्तर पाहुयात..
दीर्घकालीन अंदाजानुसार, सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यामुळे पुढील काळात उघडीपीचा काळ वाढत जाईल आणि परतीचा मान्सून साधारणपणे १० ते १२ ऑक्टोबर पर्यंत माघार घेईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर बराच कमी होईल आसा अंदाज साबळे यांनी दिलाय..
मात्र, ‘ला निना’ (La Niña) च्या प्रभावामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा ला निनाच्या प्रभावामुळे आँक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यातही काही ठिकाणी पाऊस होन्याची शक्यता आहे असे साबळे यांनी सांगितले…
तसेच या वर्षी थंडीचा कालावधी आणि प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असून ती १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान चांगली थंडी जाणवेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय..








